Always Happy
Smile Is A Good Therapy To Forgot Sadness
Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements
Welcome
Monday, July 10, 2017
साखरपुड्यात अंगठी अनामिकेतच का घालतात?
Tuesday, November 4, 2014
लग्न म्हणजे काय असतं?
Thursday, August 7, 2014
काय वाटलं तिला बघून ?
Saturday, June 22, 2013
Friday, November 9, 2012
वसुबारस आणि महत्त्व
Saturday, May 12, 2012
हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो
Wednesday, March 28, 2012
बर झाल नाकारलस
नाहीतरी कुठे मी इतका चांगला आहे ?
बर झाल नाकारलस
कारण मनातल्या प्रेमाचा रंगही आता भंगला आहे
बर झाल नाकारलस
नाहीतरी वेळ कुठे आहे तुला माझ्यासाठी
आणि मी भेटायच ठरवल
तरी भेट काय घ्यावी तुझ्यासाठी
बर झाल नाकारलस
नाहीतरी तूझे शौक परवडनारे नव्हते
देण्यासाठी प्रेमच उरले
तेवढेच तुला दिसत नव्हते
बर झाल नाकारलस
नाहीतरी माझ्या भावना तुला समजतच नव्हत्या
ओल्या ठेवल्या भरपूर रे
पण तया हृदयातल्या ह्रुदयातच सुकत होत्या
बर झाल नाकारलस
कारण विरहाची मला सवय आहे
परत परत प्रेमात पडायच
हेच तर खर वय आहे
बर झाल नाकारलस
नाहीतरी तुझ्या आठवणीचा नुसता खच पडला आहे
तू दिलेल्या चोकलेटचा कागद
अजुनही पाकिटात तसाच दडला आहे
बर झाल नाकारलस कारण
त्या चोकलेटची चव जिभेवरून उडली आहे
बर झाल नाकारलस
त्यातली थोडीशी गोडी ह्रुदयात माझ्या उरली आहे
बर झाल नाकारलस
कारण दुराव्यताही मजा आहे
तुझ्या विरहात कविता लिहिण्याची
हीच तर खरी नशा आहे
--
देशात काय चाललय
परवाच एका स्फोटात मेलो.पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो.स्वर्गात जाताच टिळक भेटले.नमस्कार म्हणताच प्रसन्न हसले.टिळकांनी विचारले, स्वातंत्र्यानंतर बदललय का काहि ?म्हटल छे हो, सरकारच डोक ठिकाणावर नाहि.आजही स्वातंत्र्यासाठी आम्ही रक्तच देतो.पण आझाद मात्र काश्मीर होतो.दुरवर सावरकर दिसले म्हणुन धावलो.म्हटल तात्या आज जन्माच पुण्य पावलो.ते म्हणाले, सध्या तरी सगळ निवांत आहे.स्वर्गात काँग्रेसवाला नाहि तर सगळ शांत आहे.त्यांनाच विचारले तात्या इथे शिवराय कुठे राहतात.म्हणाले ते, पहा सौधातुन आपल्याकडेच पाहतात.छत्रपतीँचा विजय असो म्हणुन चटकन हात जोडले.पण घडले भलतेच, ते मझ्यावरच ओरडले.काय रे ? कोण्या जेम्स लेनने म्हणे बत्तमीजी केली.तुमची अक्कल तेव्हा सांगा कोठे चरायला गेली ?मान वर करायची माझी हिम्मत होत नव्हती,आणि महाराजाची नजर माझ्यावरुन ढळत नव्हती.मी म्हणालो, कबुल आहे महाराज तुमची स्वप्न आम्हाला कळलीच नाही.पैसा सोडुन आमची नजर दुसरीकडे वळलीच नाही.पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे नेमके आवाज हेरतात,ब्र म्हणायचा अवकाश लगेच गाढवाचे नांगर फिरवतात.खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो,कोणीही आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडतो.हे सगळे ऐकुन महाराजांच्या गालाचे कल्ले थरारले,आमच केविलवाण जग पाहून डोळ्यात पाणी तरारले.क्षणभर राजेपण विसरुन ते दुःखाने थरथरले,आणि मग आमच हे अस वगण बघुन रागाने बिथरले.पाय लटपटले मला वाटले आता कंबख्ति भरली म्हणुन समज,चुकिची शिक्षा गर्दन मारलीच म्हणुन समज.पण मेलेल्यांना मारायला ते खुर्चीतले नेते नव्हते,न्याय कठोर असले तरि ह्रदय त्यांचे रीते नव्हते.मान खाली घालुन तसाच पुढे गेलो.अहम आश्चर्यम स्वर्गात मला औरंगजेब भेटला,म्हणे काफरांना मारुनच तर स्वर्ग गाठला.जिन्हा सुद्धा तिथेच होता.म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखांवर जाईल,आणि मग स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल.त्याला म्हणालो जरी स्वर्गाची फाळनी होनार आसेलतरी 55कोटी द्यायला गांधी स्वर्गात नसेलतुम्ही आजून किती मागनार दूस~यांकडून आडोसेईथे पून्हा जन्म घेतील हजारो नथुराम गोडसेत्याला मूतोड जवाब देवून तसाच पुढे निघालोस्वर्गात मला महात्मा फुले भेटलेत्यांना पाहून डोळ्यात माझ्या आश्रूंचा सागर दाटलाकस सांगु तूम्हाला खाली आता शिक्षनाचा काळा बाजार थाटलाहे सर्वजन रात्री मला एकत्र भेटले .आजच्या माणसाची व्यथा ऐकुन रागाने पेटलेते म्हणाले,आम्ही केलेल्या कार्याला काहीच नाही का अर्थ ?आमचे प्रयत्न, आमचे बलीदान सगळेच कसे गेले व्यर्थ ?शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातच भ्रष्टाचार कसा काय आलामाणसाच्या स्वार्थी वृत्तीमूळे सामान्य माणूस पूरता बेजार झालामंदिर, मुर्ती, पुतळे बांधुन देवधर्म तुम्ही करतापण माणसातील खऱ्याखूऱ्या देवालाच तुम्ही पुन्हा पुन्हा मारतासर्व जीवांमध्ये मानवाला सर्वात श्रेष्ठ बनवलपण या माणसानेच आज माणसातील माणुसपण नष्ट केलबोलताना वाईट वाटते पण आता वेळ आली आहे विचार करण्याचीखरच चुकी केली का माणूस हा प्राणी बनवण्याचीबोलून बोलून थकले आणि झाले सगळे शांतअसे वाटले मरण त्र आलेच होते पं हा आहे कायमचा एकांत अजूनही वेळ गेली नाही सुधारा आपले आयुष्यनाहीतर मनुष्याच्या विनाशाला कारणीभूत ठरेल फक्त आणि फक्त मनुष्य ..........!!
Wednesday, March 21, 2012
एक अश्रू..
एक अश्रू..
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा.. तो अश्रू.... हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही..........
एक पाऊल..
तुझ्यासाठीच अडखळणारं,
तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..
तुझी पाऊलखूण शोधणारं..
एक नजर..
जी सारखी तुलाच शोधते...
प्रत्येकाच्या डोळ्यात..
तुझीच छबी शोधते..
मागे वळून .. पुन्हा पुन्हा.. तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..
एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..
तुझ्याशिवाय मोकळी..
एक कुंचला..
तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..
तू येऊन पुन्हा..
रंग भरशील माझ्या आयुष्यात..
अशी आस लावणारा..
एक जीव..
तडफडणारा.. असहाय्य..
तुझ्याविना.. तुझ्याचसाठी...
Monday, March 12, 2012
मला आवडणाऱ्या काही साध्या-सोप्या गोष्टी लिहीतो
असं झालं की मला एक गोष्ट आठवते. एक माणूस देवाचे आभार मानत असतो. तो म्हणत असतो की "माझ्याकडे नवे बूट नव्हते म्हणून मी दु:खी होतो त्या वेळी तू मला एक माणूस दाखवलास ज्याच्याकडे पाय पण नव्हते. मग माझी तकरार आपोआप मुकी झाली." थोडक्यात सांगायचं तर आपण छोट्या दु:खांकडे लक्ष देऊन त्यांना मोठं करतो पण छोट्या सुखांकडे लक्षच देत नाही. जसं बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत, तसं त्याहून कितीतरी जास्त गोष्टी आपल्याला खुश करायचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या एक लहानशा दु:खाच्या नादात आपण त्या दहा खुश करणाऱ्या गोष्टींना विसरतो.
जर आतापर्यंतचे विचार पटले असतील, तर मनात एक प्रश्न पण आला असेल. आपण या लहान सुखांकडे लक्ष कसं द्यावं? काही मनासारखं नाही झालं तर त्याला पटकन मनातून बाहेर काढून जे आपल्याला सुख देतं ते कसं करावं? याचं उत्तर माझ्या एका मैत्रिणींकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. त्या म्हणाल्या की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काही नाही' आसं म्हटलं की त्या 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायच्या. मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. त्या पण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायच्या.
पण काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठतास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला अशी आमची उत्तरं येऊलागली. मग त्यांच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊलागतात.
तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जाताना पण 'आत देव आहे' या विश्वासाने नमस्कार करतो, तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा. अट फक्त एकच, की तुम्ही 'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे. हा प्रश्न स्वत:ला तर विचाराच, पण आपल्या मित्रांना किंवा घरातल्या व्यक्तिंना विचारा. उत्तर कितीही शुल्लक वाटलं तरी नीट ऐका, तुमचं उत्तर पण सांगा. बघा तुम्हाला पण मस्त वाटेल आणि तुमच्या मित्रांना पण. हा प्रश्न खूप बाळबोध वाटतो, किंवा मित्र चेष्टा करतील असं वाटत असेल तर आधी काही दिवस स्वत:लाच विचारा. मग एकदा तुम्ही रोजच्या दिवसाचा आस्वाद घेऊलागलात की मित्रांना विचारा 'आजची चांगली गोष्ट काय?'
आता शेवटी मी मला आवडणाऱ्या काही साध्या-सोप्या गोष्टी लिहीतो. खाण्यावरून सुरूवात केली तर तेलकट तरी आणि तिखट मिसळ, आईस-क्रिम, उन्हात फिरून आल्यावर उसाचा रस, पुण्यातली सुजाताची मस्तानी, पाऊस पडत असताना गरम गरम भजी, रात्री झोपायच्या आधी एक छोटं चॉकलेट, आईच्या हातचं जेवण, हापूस आंबा असे असंख्य पदार्थ आहेत. हे रोज एक एक करून खायचं असं ठरवलं तरी वर्षाच्या 'चांगल्या गोष्टींची' यादी होईल. रेडिओ वर अचानक लागलेलं आपल्याला आवडणारं गाणं, हे पण एक वेगळंच सुख आहे. त्यात ते गाणं थोडं जुनं असेल आणि आपल्याला त्याचा विसर पडत असताना ते लागलं तर मग अजूनच मस्त वाटतं. पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा सुगंध पण हृदयात सुकलेल्या भरपूर आठवणी परत ओल्या करून जातो. आपण नवी साडी किंवा नवा शर्ट घातला की होणारी प्रशंसा हे पण एक छोटंसं सुखच आहे. अंघोळ करून स्वच्छ झाल्यावर अंगावर मारलेलं अत्तर, आपल्याला दिवसभर त्याच्या सुगंधाने ताजंतवानं ठेऊशकतं. अशा कितीतरी लहान वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला खूप आनंद देऊशकतात, जर आपण त्यांना आनंद द्यायची संधी दिली तर…