साखरपुड्यात वधू-वर एकमेकांच्या अनामिकेत
अंगठी घालतात.
ही अंगठी अनामिकेतच
का घालतात?
एका तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख
मांडणी (प्रयोग करून)पहा...
.
त्याच्या मते, आपल्या हाताची
दहा बोटे. हे एक कुटुंब.
.
.त्यातील अंगठा हे आपल्या आई-
वडिलांचे प्रतीक.
.
अंगठ्याजवळचे बोट आपल्या भावंडांचे
प्रतीक.
.
मधले बोट म्हणजे आपण स्वत:
.
चौथे अनामिका...
म्हणजे आपला जोडीदार,
.
.तर करंगळी म्हणजे
आपली अपत्ये.
.
ही झाली गृहीतकं.
आता पाहू या कुटुंबातील
या घटकांशी आपली नाती कशी आहेत
ती.
.
आता फोन बाजूला ठेवा
आपल्या
हाताचे तळवे नमस्काराप्रमाणे
जोडा.
.
मधली बोटे आतील बाजूस खाली दुमडून
बाकी बोटांची फक्त वरची टोकं
जुळवा.
आता प्रथम अंगठे एकमेकांपासून दूर
करा. ते
उघडता येतील.
.
.कारण आई-वडील काही जन्मभर
लाभत
नाहीत. कधी ना कधी ते
आपल्याला सोडून जातात.
.
अंगठे मिटवून त्याच्या शेजारील बोटे
उघडा.
तीही उघडतील.
कारण भावंड त्यांना त्यांची कुटुंबं
आहेत.
स्वत-ची आयुष्यं आहेत.
.
आता ती बोटं जुळवून
आपल्या करंगळ्या उघडा.
.
त्याही उघडतील. कारण तुमची मुलं
मोठी झाल्यानंतर
घरटं सोडून भरारी घेणारच आहेत.
.
आता करंगळ्या मिटा आणि अनामिका एकमेकांपासून
वेगळ्या करा.
.
आश्चर्य वाटेल;
पण त्या वेगळ्या होत नाहीत. कारण जोडीदार, म्हणजे पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात. ते सुखात आणि दुखातही एकमेकांना साथ देतात...!
''आयुष्यास आहे सुंदर अर्थ
अनामिके शिवाय सारे व्यर्थ ''
🙏🌹🌹🌹🌹