Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Monday, July 10, 2017

साखरपुड्यात अंगठी अनामिकेतच का घालतात?





साखरपुड्यात वधू-वर एकमेकांच्या अनामिकेत
अंगठी घालतात.
ही अंगठी अनामिकेतच
का घालतात?
एका तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख
मांडणी (प्रयोग करून)पहा...
.
त्याच्या मते, आपल्या हाताची
दहा बोटे. हे एक कुटुंब.
.
.त्यातील अंगठा हे आपल्या आई-
वडिलांचे प्रतीक.
.
अंगठ्याजवळचे बोट आपल्या भावंडांचे
प्रतीक.
.
मधले बोट म्हणजे आपण स्वत:
.
चौथे अनामिका...
म्हणजे आपला जोडीदार,
.
.तर करंगळी म्हणजे
आपली अपत्ये.
.
ही झाली गृहीतकं.
आता पाहू या कुटुंबातील
या घटकांशी आपली नाती कशी आहेत
ती.
.
आता फोन बाजूला ठेवा
आपल्या
हाताचे तळवे नमस्काराप्रमाणे
जोडा.
.
मधली बोटे आतील बाजूस खाली दुमडून
बाकी बोटांची फक्त वरची टोकं
जुळवा.
आता प्रथम अंगठे एकमेकांपासून दूर
करा. ते
उघडता येतील.
.
.कारण आई-वडील काही जन्मभर
लाभत
नाहीत. कधी ना कधी ते
आपल्याला सोडून जातात.
.
अंगठे मिटवून त्याच्या शेजारील बोटे
उघडा.
तीही उघडतील.
कारण भावंड त्यांना त्यांची कुटुंबं
आहेत.
स्वत-ची आयुष्यं आहेत.
.
आता ती बोटं जुळवून
आपल्या करंगळ्या उघडा.
.
त्याही उघडतील. कारण तुमची मुलं
मोठी झाल्यानंतर
घरटं सोडून भरारी घेणारच आहेत.
.
आता करंगळ्या मिटा आणि अनामिका एकमेकांपासून
वेगळ्या करा.
.
आश्चर्य वाटेल;
 पण त्या वेगळ्या होत नाहीत. कारण जोडीदार, म्हणजे पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात. ते सुखात आणि दुखातही एकमेकांना साथ देतात...!
''आयुष्यास आहे सुंदर अर्थ
अनामिके शिवाय सारे व्यर्थ ''
🙏🌹🌹🌹🌹