Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Friday, July 29, 2011

फरक कुठे पडला आहे


फरक कुठे पडला आहे



लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|

लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|

Monday, July 25, 2011

विसरतो पुन्हा.."भारत माझा देश आहे"

सरळ काटकोनात हात
शाळेत बोबड्या आवाजात
म्हणायचो प्रतिज्ञा "भारत माझा देश आहे"

समज आली - आणखी जोशात ..
...करून अगदी ताठ हात..
म्हणायचो प्रतिज्ञा "भारत माझा देश आहे"

शाळा सुटली.. तशी प्रतिज्ञा..

विसरतो..."भारत माझा देश आहे"

आम्ही आता मल्टिपलेक्समधे सिनेमा पाहतो
पॉपकॉर्न ठेवून बाजूला राष्ट्रगीताला उभे राहतो
राष्ट्रगीत ते पाहताना दाटून येते देशभक्ती
मुलानाही मग करतो ताठ उभ राहायची सक्ती
राष्ट्रगीत संपते.. तसा ताठ कणा मोडतो..
रिलॅक्सिंग खुर्चीत आम्ही अस्ताव्यस्त पसरतो..

विसरतो .."भारत माझा देश आहे"

'बॉर्डर' सिनेमा पाहून राष्ट्रप्रेम उफाळते
धमण्या नसा-नसातून रक्तरक्त उसळते
सीमेच्या सैनिकाला मन सलामसुद्धा करते
धारतीर्थी पडले जे त्यानाही मन स्मरते
सिनेमा संपतो.. सैनिकाची आठवण मग मनाला कुठली होते
आणि धमन्या नसातून वाहणारे रक्त पुन्हा बर्फासारखे थिजते


विसरतो "भारत माझा देश आहे"

भारत पाक मॅच म्हणजे देश भक्तीचे भरते
सचिन शोएबची जुगलबंदी मस्त पैकी रंगते
फाळणीची आठवण पुन्हा मनात दाटते
जिंकणे न्हवे फक्त, त्यांची हार महत्वाची असते
मॅच संपते.. हरल्यावर देशभक्तीचा दिवा विझतो
दोन शिव्या हासडून मग जो तो वाटेला लागतो
विसरतो.. "भारत माझा देश आहे"..

स्वाभिमान ..राष्ट्र प्रेम जागवायला असे घडावे लागतात प्रसंग
तेव्हाच फक्त दिसतात आम्हाला आमच्या तिरंग्यातले रंग ..

क्षणभरच आम्ही देशप्रेमाला लागतो..
प्रजासत्ताक आणि स्वातंत्र दिन आम्ही
पब्लिक हॉलिडे म्हणून लक्षात ठेवतो ..

विसरतो पुन्हा.."भारत माझा देश आहे"
विसरतो पुन्हा.."भारत माझा देश आहे"