Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Tuesday, August 2, 2011

वारस होऊ अभिमन्यूचे


वारस होऊ अभिमन्यूचे

अनुसया गोरे यांना 'वीरमाता' आणि 'हिरकणी' हे पुरस्कार मिळाले आहेत.त्या एका शहीद सैनिकाच्या आई असल्याचा त्यांना फार अभिमान त्यांच्या मते आपण आपल्याला हवे ते शिक्षण घ्यावे पण नंतर मात्र भारताच्या सैन्यदलात सामील व्हावे. आजही भारतीय सैन्यदलात अनेक मोठमोठ्या पदव्या मिळालेले अनेक सैनिक आहेत. देशसेवा करण्याचा हा उत्तम मार्ग आहे, असे त्या म्हणतात.

जेव्हा काही वर्षांपूवीर् भारत विश्वचषक जिंकला होता तेव्हा सगळीकडे फटाके आणि आतषबाजी लावल्या होत्या. परंतु, त्याच दिवशी एक विपरित घटना घडली. जिच्याबद्दल आपण कल्पनाही करू शकत नाही. पाकिस्तानने युद्धकैदी बनवलेल्या काही भारतीय जवानांचे मृतदेह आपल्या ताब्यात दिले. त्या मृतदेहांची फार दुरवस्था केली होती. त्या मृतदेहाचे डोळे काढले गेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर सिगारेटच्या चटक्यांचे डाग होते. आजतगायत ही गोष्ट अनेकांना माहीत नाही. आपण मात्र विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होतो. हे कळल्यानंतरही आपण पाकिस्तानशी मैत्रीचे करार करतो, त्यांच्याबरोबर क्रिकेटचे सामने खेळतो, पाकिस्तानी कलाकारांच्या विनोदावर हसतो आणि त्यांच्या नटांचे सिनेमे पहायला जातो. ही तर लाजिरवाणी बाब आहे.

आज नोकरी मिळवण्यासाठी मोठ्या पदव्या घेतलेले विद्याथीर् झटत आहेत. भारतीय सैन्यदलात सुमारे २५ ते ३० हजार जागा रिकाम्या आहेत, याची कल्पनाही नसेल. देशातल्या युवा पिढीला या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारं कोणी नाही. सरकारी नोकरी असल्याने पगार चांगला व निवृत्ती-नंतरचे वेतनही जास्त मिळते. देशासाठी काही केल्याचा अभिमानवाटतो.

पाकिस्तानात उलट्या टांगल्या गेलेल्या आपल्या तिरंग्याबद्दल आपले गृहमंत्री 'छोटीसी गलती' असे संबोधतात. उलटा टांगलेला झेंडा म्हणजे युद्धात पराभव झालेल्या देशाचा झेंडा जिंकलेल्या देशात उलटा टांगला जातो; याची त्यांना साधी कल्पनाही नव्हती. एका जवानासाठी त्याच्या देशाचा झेंडा म्हणजे जणू काही त्याचा प्राणच असतो. स्वत:चा जीव गेला तरी तो आपल्या झेंड्याचा अपमान होऊ देत नाही. सैनिकांचे जीवन फार कष्टाचे असते. त्यांना कोणत्या परिस्थितीत दिवस काढावे लागतात, याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. अनुसया गोरे यांनी त्यांच्या ''वारस होऊ अभिमन्यूचे'' या पुस्तकात हे वर्णन केलेले आहे. आज प्रत्येक भारतीयाला ते पुस्तक वाचण्याची गरज आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!

No comments:

Post a Comment